Friday, October 23, 2009

Saturday, August 1, 2009


`शिवराज्य पक्ष, महासंग्राम पार्टी संयुक्‍तपणे लढणार`
सकाळ वृत्तसेवा
Saturday, July 04th, 2009 AT 12:07 AM

नागपूर - सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये होऊ घातलेली विधानसभेची निवडणूक शिवराज्य पक्ष आणि महासंग्राम पार्टी संयुक्‍तपणे लढविणार असल्याची माहिती महासंग्राम पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसीच असावा, मंडल आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी, उच्च शिक्षण संस्थांचे राष्ट्रीयीकरण, मातृशक्‍तीचा सन्मान, सत्तेमध्ये महिलांचा सहभाग, संख्येएवढी सत्ता, संख्येएवढे आरक्षण आणि सत्तेच्या दलालापासून बळीराजाची मुक्‍ती, तसेच नागपूरला मिनी मंत्रालय आदी मुद्द्यांवर उभय पक्ष संयुक्‍तरीत्या निवडणूक लढविणार आहेत. प्रा. वाकुडकर म्हणाले, आगामी निवडणुकीसाठी समविचारी नवीन आघाडी तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात 288 जागांवर आम्ही उमेदवार उभे करणार आहोत.महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मुक्‍तीचे, सन्मानाचे, ओबीसी बहुजनांच्या अस्मितेचे, उद्योजक कामगारांच्या समन्वयाचे, सत्तेमध्ये स्त्रियांच्या सहभागाचे आणि समस्त वंचितांसाठी न्यायाचे पर्व सुरू करण्यासाठी शिवराज्य पक्ष आणि महासंग्राम पार्टी एकत्र आले असल्याचे शिवराज्य पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा जयश्री शेळके यांनी सांगितले.

शिवराज्य पक्ष विधानसभेच्या२८८ जागा लढविणार
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, July 29th, 2009 AT 12:07 AM

औरंगाबाद - शिवराज्य पक्ष राज्यातील समविचारी पक्षांना सोबत घेऊन राज्यातील विधानसभेच्या सर्वच्या सर्व २८८ जागा लढविणार असून शेतकरी व सैनिकांच्या हातात आर्थिक सत्ता यावी, हा आमच्या पक्षाचा अजेंडा असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार कर्नल सुधीर सावंत यांनी मंगळवारी (ता. २८) येथे पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पक्षाची भूमिका सांगताना सावंत म्हणाले, की राजकीय घराणेशाही मोडून काढण्यावर पक्षाचा भर राहाणार असून, सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडविण्यासाठी पक्ष पुढाकार घेणार आहे. काही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून, उर्वरित उमेदवारांच्या मुलाखती लवकरच घेणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले. ५० टक्‍के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले, तसेच शिवराज्य पक्ष सर्वसमावेशक असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला. जयश्री शेळके, चक्रधर शेळके, दादाराव कुबेर, राहुल बनसोड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.



Friday, June 13, 2008

shivrajya

shivrajya

sambhaji brigade

"मराठ्यांना आरक्षित करा, अन्यथा सुरक्षित राहणार नाही' - संभाजी ब्रिगेड

पुणे, ता. ५ - मराठा समाजाला आरक्षित-सुरक्षित केले नाही, तर राज्यकर्त्यांनाही सुरक्षित राहू देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांनी आज दिला.मराठा समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मराठा आरक्षण रॅलीचे आज पुण्यात स्वागत करण्यात आले. त्या वेळी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड, श्रीमंत कोकाटे, शांताराम कुंजीर, सारिका भोसले, विजयकुमार ठुबे, संतोष शिंदे, तुषार काकडे, अर्चना जगताप, वासंती नलावडे, संतोष नानवटे, प्रभाकर दुर्गे आदी या वेळी उपस्थित होते. चोंदे म्हणाले, ""आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या निकषात बसूनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. सध्याचे सरकार हे प्रस्थापितांचे सरकार असून, तातडीने आरक्षण जाहीर करावे, अन्यथा संघर्ष तीव्र करण्यात येईल.'' दरम्यान, आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजानेही जुनी मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे मत प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले. समाजात या बाबत अज्ञान आहे आणि दुसरीकडे राजकीय इच्छाशक्ती नाही. त्यामुळे आरक्षण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे. साठ टक्के समाज हा दारिद्य्ररेषेखाली असेल, तर तो फक्त शेतीवर जगू शकत नाही; त्याला उभा करण्यासाठी आरक्षणासारख्या सवलतींची गरज आहे, असेही ते म्हणाले. सरकारने सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि इतर मागासवर्गाच्या आरक्षणात वाढ करावी, अशी मागणी कोकाटे यांनी केली.

मराठा समाजाचे करमाळ्यात आंदोलन

करमाळा, ता. १९ - मराठा समाजाला ३५ टक्के आरक्षण द्यावे, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने २५ जुलैला सकाळी दहा वाजता बायपास चौक येथे मराठा समाजाचे सर्वपक्षीय "रास्ता रोको' आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सुर्वे यांनी दिली.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. सुर्वे यांनी म्हटले आहे, की गेली १८ वर्षे मराठा समाजाला सामाजिक, शैक्षणिक आरक्षण मिळविण्यासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व अन्य ३२ कक्ष सातत्याने लढा देत आहेत. परंतु सातत्याने मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी राजकीय पुढाऱ्यांनी समाजाची फसवणूक केली आहे. त्या विरोधात मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यंत उग्र आंदोलने करण्यात येतील. त्याचाच एक भाग म्हणून २५ जुलैला "रास्ता रोको' करण्यात येणार आहे. या आंदोलनात मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन श्री. सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन खटके यांनी केले आहे.


'संभाजी ब्रिगेड'ची पंढरपुरात दगडफेक

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या 'बाइक'स्वार कार्यर्कत्यांनी रविवारी पंढरपुरात ३ एसटी गाड्यांची तोडफोड केली. यामध्ये आठ जण जखमी झाले. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर संभाजी ब्रिगेडने रविवारी अचानक दगड हाती घेत एसटी गाड्यांना लक्ष्य केले. पंढरपूर-नगर रस्त्यावर कार्यर्कत्यांनी नगरकडे जाणाऱ्या व पटवर्धन कुरोलीकडे जाणाऱ्या दोन एसटी बसच्या काचा फोडल्या. प्रवाशांनी खचून भरलेल्या या गाड्यांवर हल्ला चढवल्याने एकच घबराट उडाली. त्याचवेळी पंढरपूर-सोलापूर रस्त्यावरही या कार्यर्कत्यांनी असाच गोंधळ घातला. तेथेही एक एसटी बस फोडली. दगडफेकींच्या या घटनांमुळे एसटी प्रशासनाने बससेवा स्थगित केली.